Washim News Saam tv
ऍग्रो वन

Washim News : शेतशिवरातून २०० हुन अधिक स्प्रिंकलर तोट्यांची चोरी; भापुर शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान

Washim News : भापुरच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात गहू, हरभरा पिकांची आहे. या पिकांच्या सिंचनासाठी स्प्रिंकलर पाईप आणि तोट्या बसविल्या आहेत.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : शेतात ठेवलेले साहित्य देखील आता सुरक्षित राहिलेले नाही. याचा प्रत्यय वाशिमच्या भापुर गावाच्या (Washim) शेत शिवारात आला आहे. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी लावलेल्या स्प्रिंकलर तोट्या चोरून नेल्याचे समोर आले आहे. यात (Farmer) शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

वाशीम जिल्ह्यातील भापुरच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात (Wheat) गहू, हरभरा पिकांची आहे. या पिकांच्या सिंचनासाठी स्प्रिंकलर पाईप आणि तोट्या बसविल्या आहेत. त्यातील २०० हुन अधिक तांब्याच्या तोट्या चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेल्या. या (Theft) चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली असून वारंवार होणाऱ्या स्प्रिंकलर तोट्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून शेती सिंचनाचा प्रश्न ही त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सव्वालाखाचे नुकसान 

भापूरच्या शेतशिवारातून १२ शेतकऱ्यांच्या १ लाख २० हजार किंमतीच्या दोनशेहून अधिक तांब्याच्या स्प्रिंकलर तोट्या चोरुन नेल्याची घटना रात्रीच्या दरम्यान घडली आहे. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. यामुळे आता या स्प्रिंकलर तोट्या चोरणाऱ्यांना पकडण्याचे आव्हान रिसोड पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT