Rabbi crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Rabbi crop Insurance : रब्बी हंगामातील नुकसानीपोटी पीक विम्याची रक्कम द्या; स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

Washim News : वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्या दरम्यान गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता, यात हरभरा, गहू, तूर आणि कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम २०२३-२४ मधील पिक विमा रक्कम मिळावी; या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

वाशिम (Washim) जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्या दरम्यान गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता, यात हरभरा, गहू, तूर आणि कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊन ही पीकविमा कंपनीकडून अद्याप पर्यंत पीक विमा (Crop Insurance) मजूर करण्यात आला नाही. यात खरीप हंगामात देखील पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

दरम्यान वाशीम जिल्ह्याच्या शेजारील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरसकट पिकविमा देण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Mundhe) यांनी मंजूर केले असून त्याच धर्तीवर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट रब्बीचा पिक विमा मंजूर करण्यात यावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

SCROLL FOR NEXT