Wardha News Tur Saam tv
ऍग्रो वन

Wardha News: तुरीच्‍या भावात मोठी वाढ; उत्पादनासह आवकमध्‍ये घट

तुरीच्‍या भावात मोठी वाढ; उत्पादनासह आवकमध्‍ये घट

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर उत्पादनात घट झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Bajar samiti) तुरीची आवक घटली असून उत्पादन घटल्याने तुरीच्या भावात वाढ होत आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक कमी असताना हा भाव आणखी वाढायला पाहिजे होता. आत्ता हा भाव आठ हजारावर पोहचला (Wardha News) असताना पुढील काळात तुरीच्या भावात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहेय. (Tajya Batmya)

महाराष्ट्रात खरीप हंगामातील तूर लागवड सुमारे ११ हजार हेक्टर क्षेत्रात झाली आहे. त्या तुलनेत मात्र अतिवृष्टी आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवाक कमी आहे. वर्ध्यातील हिंगणघाट, सेलू, देवळी, आर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे भाव ७ हजार 500५०० ते ८ हजार १०० दरम्यान राहिले आहे. हे भाव आणखी वाढतील अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तूर डाळ आयात होऊ नये; अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह (farmer) व्यापारी देखील व्यक्त करीत आहेय.

अपेक्षित भाव मिळत नाही

कपाशीनंतर शेतकऱ्यांची तूर या पिकावर भिस्त असते. यावर्षी तूर पिकावर भिस्त होती. पण रोगराई आणि अतिवृष्टीमुळे पीक हातचे गेले. फार कमी उत्पादन झाले. उत्पादन खर्चही भरून निघत नाही अशी परिस्थिती आहे. तूर पिकाचे उतारे कमी झाले आहे. आता भाव वाढताना दिसत आहे. म्हणूनच तूर विकायला आणली आहे. भाव मात्र शेतकऱ्यांच्या हाती नाही; तर व्यापाऱ्यांच्या हातात आहे. शेतकऱ्याला उत्पादन खर्च जास्त आहे, भाव मिळत नाही पण इलाज नाही आहे माल विकल्याशिवाय गत्यंतर नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्र सरकारची माहिती

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

हर्बल हुक्का बार चालवायला परवानगी, कोर्टाने महाराष्ट्र पोलिसाला खडसावले, नेमकं प्रकरण काय?

Tension At Shaniwarwada: शनिवारवाड्यात नमाज पठणानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला|VIDEO

Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री घराचे दरवाजे उघडे का ठेवतात? जाणून घ्या खरं कारण

SCROLL FOR NEXT