गावकऱ्यांनी साधला जलसंधारणातून आर्थिक विकास; 10 कोटीच्या अर्थकारणात बदल दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

गावकऱ्यांनी साधला जलसंधारणातून आर्थिक विकास; 10 कोटीच्या अर्थकारणात बदल

जिल्ह्यातील औसा तालुका तसा दुष्काळी सावली असलेला शिवली गावशिवारात पाण्याचे नेहमी दुर्भिक्ष होते

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातुर : जिल्ह्यातील औसा तालुका तसा दुष्काळी सावली असलेला शिवली गावशिवारात पाण्याचे नेहमी दुर्भिक्ष होते, पण राज्य शासन भारतीय जैन संघटना आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून जलसंधारणाच ६ किलोमीटरच काम झाले आहे. पाण्याच्या संसाधनातून किमान 10 कोटीच्या अर्थकारणात बदल झाला आहे. शिवली गाव हे औसा तालुक्यातील भूकंपग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भाग आहे. दरवर्षी पाण्याची टंचाई हा नेहमीचा विषय आहे. The villagers achieved economic development through water conservation

हे देखील पहा-

शेतीला पाणी नसल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केले आहे. पण गेल्या काही वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासन आणि भारतीय जैन संघटना आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे गावशिवारातील ओढे नाले याचे जवळपास ६ किलोमीटर इतकं ४० फूट रुंद १५ फूट खोल रुंदीकरण खोलीकरण केले याचा परिणाम शिवली आणि बिरवली या २ गावाच्या शिवारात पाण्याची पातळीत वाढ झाली आहे.

याचा परिणाम या शिवारात २ हजार एकर उसाच्या क्षेत्रात वाढ होऊन आता ६ हजार एकर क्षेत्र झाले, तर सोयाबीन आणि अन्य शेतमाल पिकांच्या उत्पादनात कमालीचा बदल झाला आहे. यापूर्वी गावात एकूण शेतमाल उत्पादनातून जवळपास ५ कोटी रुपयांच उत्पादन घेतले जात होते. आता तेच उत्पादन १० कोटीच्या घरात पोहचले आहे. दुष्काळाशी झगडणार शिवली गाव ग्रामस्थांच्या एकजुटीने आता समृद्ध झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT