Nandurbar News Saam Tv
ऍग्रो वन

विज वितरण कंपनीचा हलगर्जी; दोन शेतकऱ्यांचा ऊस जळुन खाक

यामुळे या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे.

दिनू गावित

नंदुरबार - तालुक्यातील हाटमोहीदा शिवारात दोन शेतकऱ्यांचा (Sugarcane) ऊस जळुन खाक झाला आहे. ही आग (Fire) महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळेच लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी (Farmer) केला आहे. शेतातुन जाणाऱ्या तारा अतिशय खाली लोंबकळत होत्या आणि त्यातुन शॉट शर्कीट झाल्यामुळे ठिंणग्या देखील निघत असल्याची तक्रार लाईनमन यांच्याकडे केली होती.

हे देखील पहा -

मात्र वरिष्ठांनी त्याकडे दुलर्क्ष केल्याने शॉटशर्कीट होऊन ऊसाला आग लागून हाटमोहीदा येथील गिरधर पाटील आणि युवराज पाटील यांच्या शेतातील ऊस जळुन खाक झाला आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. यावर महावितरण कडून तात्काळ भरपाई न मिळाल्यास आत्मदहणाचा इशारा देखील संबंधीत शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत महावितरणच्या अभियंत्यानी घटनास्थळी भेट देत पंचनामा देखील केला आहे. सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात अशा पद्धतीन ऊस जळल्याची ही तिसरी घटना असल्याने याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे करत गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

SCROLL FOR NEXT