सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला संदीप नागरे
ऍग्रो वन

सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला

जिल्ह्यातील इसापूर, सिद्धेश्वर धरणामध्ये येलदरी धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : जिल्ह्यातील इसापूर, सिद्धेश्वर धरणामध्ये येलदरी धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाल्याने गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पाण्याच्या आवक वाढत गेली तर सळणा येथील पूल पाण्याखाली येऊन नांदेड- औरंगाबाद हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

औंढा नागनाथ तालुक्यामधील सिद्धेश्वर धरणाची गेट उघडून ५०,००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येत आहे. या दरवाजे दहा फुटाने वर घेत पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे मातामाथा या ठिकाणील पुलाच्या खालोखाल नदीपात्रात पाणी वाहत आहे. पाण्याचा विसर्ग वाढत गेला, तर येथून जाणारा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे जलसंपदा विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावर जाणाऱ्या वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

याचप्रमाणे पूर्णा नदी पात्रा शेजारील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण २५ गावांना देखील महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्णा नदी पात्रात पाणी पातळी वाढली असल्यामुळे गावातील छोट्या ओढ्यांमधील पाणी या पात्रात येण्यास अटकाव होत आहे. यामुळे ओढ्यांचे पाणी आजुबाजुच्या शेतामध्ये जाऊन तुंबले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची हानी झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

IND vs Pak : ठरलं! गरीब पाकिस्तानानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, भारताविरुद्ध T20 वर्ल्डकप सामना खेळणार नाही

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

SCROLL FOR NEXT