सोयाबीनला अच्छे दिन, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी Saam Tv
ऍग्रो वन

सोयाबीनला येणार अच्छे दिन! ; भावात वाढ होण्याची शक्यता

गत वर्षी शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला त्यात दुप्पट भाव जास्तीचा मिळाला आहे.

दिपक क्षीरसागर

लातुर: मागील काळात सोयाबीनचे (Soyabean Rate) दर 10 हजाराच्या पेक्षा जास्त होते, पण सध्याला सोयाबीन बाजारात येत असताना आणि आयात सोयाबीनची आवक होत असताना भाव साडेचार हजार रुपयांवर आलेला आहे. यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी आहे आणि आगामी काळात भाव वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असल्याने सोयाबीन पिकाला अच्छे दिन येणार आहेत. लातुरची सोयाबीनचं कोठार अशी ओळख आहे. पण गत वर्षी आणि चालू वर्षी निसर्गाच्या प्रकोपामुळं सोयाबीनचे पीक संकटात आलं पण चालू वर्षी सुध्दा उत्पादन कमी आल्याने शेतकरी बाजारात विक्रीसाठी सोयाबीन आणत असून आता 5 पाच हजार पाचशे भाव झाला आहे.

गत वर्षी शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला त्यात दुप्पट भाव जास्तीचा मिळाला आहे. लातुर कृषी उत्पन्न बाजार समितीने 18 तारखेपासून शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. आजतागायत 4 कोटी 15 लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप केले आहेत आणि 10 कोटी रुपयांची मंजुरी देऊन ठेवली असून शेतकऱ्यांना वाटप करणे सोईचे होणार आहे. केवळ 48 तासात शेतकऱ्यांना खात्यात पैसे देण्यासाठी सोय केली असून मुरुड आणि लातुर इथे 6 हजार मेट्रिक टन क्षमता असून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललित भाई शहा यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teachers Salary: दीड लाख शिक्षकांचा पगार थांबणार; सुप्रीम कोर्टानंतर शिक्षण विभागाकडूनही कोंडी?

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये?

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT