Osmanabad Politics Saam Tv
ऍग्रो वन

जिल्ह्यात शिवसेना- भाजपात पिकविम्यावरून श्रेयवादाची लढाई

राणा पाटील विरूध्द ओमराजे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : मागील आठवड्यात औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने शेतकऱ्यांना (farmers) दिलासादायक निर्णय दिला. जिल्ह्यात (district) २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचा पिकविमा (crop insurance) संदर्भातील हा निकाल होता. मात्र, आता यावरून जिल्ह्यात शिवसेना- भाजपात (Shiv Sena BJP) चांगलीच जुंपली आहे. त्यावरून श्रेयवाद चांगलाच पेटला असून आरोप (Allegations) प्रत्यारोप होत आहेत.

२०२० मध्ये जिल्ह्यात तुफान अतिवृष्टी झाली होती. यात त्यांना पीकविमा कंपनीकडून योग्यती नुकसानभरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकविम्या संदर्भात जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने याचिकाकर्ते प्रशांत लोमटे व शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याच संदर्भात मात्र भाजपाच्या आधी शिवसेनेच्या वतीने प्रविण जाधव व शेतकऱ्यांनी देखील याचिका दाखल केली होती.

हे देखील पाहा-

यावर न्यायालयाने पिकविमा कंपनीने ६ आठवड्यात ही भरपाई द्यावी असे आदेश देण्यात आले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र यासाठी आता दोन्ही गटाकडून श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातूनच राणाजगजितसिंह पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत कंपनीने ही नुकसान भरपाई न दिल्यास राज्यसरकारने ही मदत द्यावी, अशी मागणी करत राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे.

राणा पाटील यांच्या या मागणीवरून जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर आक्रमक झाले आहेत. राणा पाटील हे कंपनीची एजंट असल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढविला आहे. तसेच खरीप २०२० च्या पिकविम्या संदर्भात शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्वात अगोदर पिकविमा कंपनी विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र राणा पाटील श्रेय घेत आहेत तसेच ऐकीकडे पिकविमा आमच्यामुळे मिळतोय, असे दाखवुन बॅनरबाजी करत आहेत. लोकांना मॅसेज पाठून मीच विमा मिळवला हे सांगत आहेत.

मात्र राणा पाटील आणि विमा कंपनी यांचे लागेबांधे असुन मोठा घोटाळा असल्याचा संशय राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. २०२० मध्ये तुफान अतिवृष्टी झाली होती. यामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत स्वरूपात फुटकी दमडी देखील अद्याप मिळाली नाही. मात्र खंडपीठाच्या निकालावरून एकमेकांवर ती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, आणि या दोन्ही गटातील प्रमुख याचिका करते पडद्यामागे पडले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर महात्मा फुले दांपत्यांचा अवमान; विंश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ajit Pawar Death: अजित पवार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट? रोहत पवारांची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद

ठाणे, कल्याणमधून मुंबईला काही मिनिटांत पोहोचता येणार; मेट्रो १२ चा विस्तार होणार;कसा असेल मार्ग?

बीडमध्ये एसीबीची मोठी कारवाई; मुंडेंना लाच घेताना रंगेहाथ पकडलं; राज्यात खळबळ|VIDEO

PM Kisan 22nd Instalment: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये येणार? PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT