farmer
farmer saam tv
ऍग्रो वन

Sangli: भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा भरल्याची खात्री करावी : मनोज वेताळ

विजय पाटील

सांगली : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना (crop insurance ) खरीप हंगाम २०२१-२२ अंतर्गत सांगली (sangli) जिल्ह्यातील एकूण १२ हजार १९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील काही महसूल मंडळासाठी विमा नुकसान भरपाई लागू झालेली आहे. काही शेतकऱ्यांची (farmers) विमा नुकसान भरपाईची रक्कम कागदपत्रातील त्रुटीमुळे त्यांच्या बँक खात्यावर जमा होवू शकली नाही. यामध्ये बँक खाते नंबर किंवा अस्पष्ट कागदपत्रे इत्यादी बाबीमुळे खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकलेली नाही. संबंधित शेतकऱ्यांनी विमा नुकसान भरपाई जमा होण्यासाठी विमा भरल्याची खात्री करून एच.डी.एफ. सी. एर्गो विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोज वेताळ (District Superintendent of Agriculture Manoj Vetal) यांनी केले आहे. (sangli latest marathi news)

एच. डी. एफ. सी. एर्गो विमा कंपनीकडील अहवालानुसार ११ हजार २३० शेतकऱ्यांसाठी एकूण १८ कोटी ४५ लाख ६३ हजार ६७५ इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे. त्यापैकी ११ हजार १०४ शेतकऱ्यांची विमा भरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.

तथापि १२६ शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाईची रक्कम कागदपत्रातील त्रुटीमुळे त्यांच्या बँक खात्यावर जमा होवू शकली नाही. यामध्ये बँक खाते नंबर किंवा अपुर्ण कागदपत्रांमुळे खात्यामध्ये रक्कम जमा होऊ नाही असे कृषी खात्याने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT