Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

Crop Loan : खरीप संपला तरीही कर्ज वाटप होईना; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

राजेश काटकर

परभणी : खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकेमार्फत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात असते. मात्र यंदाचा खरीप हंगाम संपण्यावर आला असताना शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कर्ज वाटप होत नसल्याचे चित्र परभणी जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु आहे.  

परभणी (Parbhani) जिल्ह्यात गतवर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर केलेल्या खर्च वाया गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पीक कर्ज (Crop Loan) उपलब्ध व्हावे, यासाठी जवळपास १५०० कोटी रुपयांचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. त्यानुसार प्रत्येक बँकेला उद्दिष्ट आखून दिले आहे. मात्र या नियोजनावर बँका काम करत नसल्याचे दिसून येत आहे. 

अर्ज देऊनही कर्ज मिळेना 

जिल्ह्यातील काही बँकांनी केवळ १० ते १५ शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप केल्याची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीआधी बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला. सोयाबीन महिनाभरात कापणीला येणार आहे. मात्र अद्यापपर्यंत बँकेने त्या अर्जावर कोणतेही कार्यवाही केलेली नाही. खरीप हंगाम संपला तरीही यांचे काही पीक कर्ज वाटप होत नसल्याचे शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT