Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : टाकाऊ वस्तु पासून वनराई बंधाऱ्याची निर्मिती; शेतकऱ्यांची श्रमदानातुन नाल्यावर केली बांधणी

Parbhani jintur News : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात पाझर तलाव, सिंचन तलाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोटे मोठे ओढे नाले आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असते.

राजेश काटकर

परभणी : नदी- नाल्यातील पाणी वाहून जात असते. वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधल्यास फायदा होत असतो. याकरिता शासकीय योजनेतंर्गत निधी मंजूर होण्याची वाट पाहावी लागते. मात्र जिंतूर तालुक्यातील अंगलगाव येथील शेतकर्‍यांनी एकत्र जमून शेतातून जाणार्‍या नाल्यावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातुन वनराई बंधारा तयार केला आहे. इतकेच नाही तर या शेतकऱ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून हा बंधारा बांधून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात पाझर तलाव, सिंचन तलाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोटे मोठे ओढे नाले आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असते. म्हणून वाया जाणार्‍या पाण्याला अडवून पाणी जमिनीत जिरवले; तर विहीर व बोर यांची पाणी पातळीत वाढ होते. याचसाठी शेतकऱ्यांनी नाल्यातील वाहून जाणारे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला.  

२५० बॅगचा वापर 

जिंतूर तालुक्यातील अंगलगाव येथील शेतकर्‍यांनी एकत्र येत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी एल. ए. शिंदे, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. सदर बंधारा हा २५० बॅगचा असून जवळपास ४ तास ५० शेतकर्‍यांनी श्रमदान केले. टाकावू वस्तूपासून शेतकर्‍यांनी श्रमदानातून हा बंधारा तयार केला आहे. बंधार्‍यात ५० फुट रुंद, ६०० फूट लांब आणि जवळपास ५ फुट खोल एवढा नाल्यामध्ये पाठीमागे पाणी साठा होणार आहे. 

आणखी दहा बंधारे उभारणार 

बंधारा बांधल्याने नाल्या लगतच्या शेतकर्‍यांना गहु, ज्वारी व हरभरा या पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपलब्ध होऊन जवळपास १५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे लगतच्या विहिरीची पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे गावात १० वनराई बंधारे बांधण्याचे शेतकरी व गावकर्‍यांनी संकल्प केला असून लवकरच ते पूर्ण करणार आहेत.

हा वनराई बंधारा तयार करण्यासाठी कृषी सहाय्यक जी. टी. राठोड व शेती शाळेतील शेतकरी यांनी किशोर शेळके मंडळ कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून गावकर्‍यांच्या मदतीने बंधारा पुर्ण केला. याकामी गावातील सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, प्रगतशील शेतकरी, शेती शाळेतील सर्व शेतकरी आणि कृषी विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT