Parbhani; हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी राजेश काटकर
ऍग्रो वन

Parbhani; हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांचे उभे पीक सततच्या पावसामुळे असे सडून जात आहे

राजेश काटकर

परभणी : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे काही शिवारातील विहिरी पाण्याने तुडूंब भरल्या आहेत. तर शेतकऱ्यांचे उभे पीक सततच्या पावसामुळे असे सडून जात आहे. सगळीकडे पाऊस झाला असला, तरी त्याचे परिणाम वेगवेगळे झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडे निवेदनांचा भडीमार करत आर्थिक मदत देण्याची मागणी विविध पक्ष, संघटना आणि पदाधिकारी करत आहेत.

परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पाऊस हा त्रासदायक ठरला आहे. यामुळे काही ठिकाणी तालुकानिहाय ओले दुष्काळ जाहीर करा, आर्थिक मदत त्वरीत द्या, यासह विविध मागण्या शासन दरबारी विविध पक्ष, संघटना आणि पदाधिकारी करत आहेत. विहीर भरली काठोकाठ, सर्वत्र पाणीपातळी वाढली आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी संकटाची मालिका घेऊन आला आहे.

हे देखील पहा-

पावसाने धारण केलेले विचित्र रूप पिकांचे नुकसान करीत आहे. सुरवातीला अतिपावसामुळे मुग, उडीदाच्या शेंगाना कोंब फुटल्याने नुकसान झाले आहे. आता टच्च भरलेल्या सोयाबीनच्या शेंगा सततच्या पावसामुळे भिजल्याने या शेंगानाही अंकुर फुटत असल्याचे मुग, उडीद पिकांचे नुकसान होऊन या पिकांना कोंब फुटले आहे. तर आता सप्टेंबर महिन्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून काढणीला सुरवात होत नाही.

तोच सोयाबीनवर नवीन संकट आले आहे. आता हिरव्या शेंगानाच अंकुर फुटले. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यामुळे सोयाबीनचे पिकच उपटून फेकण्याची तयारी काही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पाण्याने पिके वाहून जात जमीन खरडुन गेली असल्याने हेक्टरी पन्नास हजार मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे.

जिल्हाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्ह्यात नुकसान पाहणी दौरा केला आहे. पण गोदावरी काठ आणि दुधना काठावरील शेतकऱ्याचे जायकवाडी निम्नदुधना व येलदरी धरणाचा विसर्ग केल्याने पाटबंधारे खात्याच्या निक्रुस्ट कामाचा फटका हजारो शेतकऱ्याना बसत आहे. अतिवृष्टी व विसर्गाच्या पाण्याने शेतातील पिंकासह जमिनी खरडुन गेली आहे.

लाखोंचे नुकसान झाले, तरी पंचनाम्यात अतिवृष्टीचे निकष न लावता पूरग्रस्त पंचनामे करून कोल्हापूर सांगलीप्रमाणे मदतीची मागणी संघटना करत आहेत. मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. जिल्हात झालेल्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे संथ गतीने होत असून, दिवाळीपूर्वी हातात काही पडत का? याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

SCROLL FOR NEXT