पंढरपूर : ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि केळी उत्पादनासाठी अग्रेसर असलेल्या पंढरपूर तालुक्यात तब्बल २० वर्षांनंतर कडधान्यांचा पेरा वाढला आहे. यंदाच्या खरिप हंगामात उडीद, तूर, मूग या कडधान्यासह सूर्यफूल आणि भुईमूग या तेलबियांची सुमारे पाच हजार एकरावर लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दोन हजार चारशे एकरावर उडीद पिकाची लागवड झाली आहे. ही लागवड प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या तालुक्यातील कासेगाव, करकंब चळे या भागात सर्वाधिक झाली आहे.
निसर्गाचा लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. बदलत्या वातावरणाचा परिणाम फळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम पंढरपूर तालुक्यात देखील पाहण्यास मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकरी आता कडधान्याचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे.
बागांवर होतोय किडीचा प्रादुर्भाव
बदलत्या हवामानामुळे द्राक्ष, डाळिंब बागांवर वाढलेला किडीचा प्रादुर्भाव आणि बाजारातील दराची अनिश्चिती यामुळे फळबाग शेती संकटात आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांचा कडधान्य लागवडी कल वाढला आहे. या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. कासेगाव येथील शेतकरी नैशाद शेख यांनी ९ एकरावर उडीदाची लागवड केली आहे. सध्या पिक जोमात आले आहे. सरासरी एकरी १५ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.
सध्याच्या बाजारभावाने प्रती क्विंटल सात हजार रूपये दर मिळाला, तरी एकरी १ लाख ५ हजार रूपयांचे उत्पन्न हाती येईल अशी त्यांना अपेक्षा आहे. दरम्यान पेरणी, बियाणे, खते, मजुरी यासाठी त्यांना एकरी २० हजार रूपयांचा खर्च आला आहे. कमी खर्चात, कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारी उडद शेती या भागातील अनेक शेतकर्यांना खुणावते आहे. यामुळेच उडीद पिकांची लागवड अधिक झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.