Latur News Saam Tv
ऍग्रो वन

१३ मंडळांत होणार पिकांचे पंचनामे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश; दोन दिवसांत मागविला अहवाल

पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके पाण्यात गेली. शेतकऱ्यांवर (Farmer)आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये पिकांचे व शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषि विभागाला दिल्याची माहिती महसूल विभागातून देण्यात आली आहे.

लातूर (Latur) जिल्ह्यातील ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या लातूर तालुक्यातील लातूर, बाभळगाव, हरंगुळ, गातेगाव, तांदुळजा, चिंचोली, कन्हेरी, अहमदपूर तालुक्यातील खंडाळी, हाडोळती, निलंगा तालुक्यातील निटूर, रेणापूर तालुक्यातील कारेपूर, पळशी, जळकोट या महसूल मंडळांचा समावेश आहे.

हे देखील पाहा -

कधी नव्हे यंदा शंखी गोगलगायींनी खरीप पिकांवर हल्ला चढविला आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीप पिकांवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना त्यावरील उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात ८ जुलैपासून संततधार व अतिवृष्टीला सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील खरिपाची कोवळी पिके पाण्यात गेली.

शेतकऱ्यांचे खुप मोठे नूकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. त्यानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आदेश काढून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे व शेतजमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT