सागर निकवाडे
नंदुरबार : आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होत असल्याने शेतात ३ फुटांपर्यंत पाणी साचल्याने पांढर सोन मातीमोल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
आठवडाभरापूर्वी आलेला परतीचा पाऊस (Rain) अजून देखील गेलेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसानं शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका खुडून ठेवला आहे. तर कापूस वेचणीला देखील सुरवात करणार होते. मात्र पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्याचे नियोजन बिघडले असून कापूस वेचणी करता येत नसल्याने बोन्ड काळवंडली आहेत.
दरम्यान नंदुरबार तालक्यातील सैताने गावात शेकडो हेक्टर कापूस पिकाचे नुकसान झाले आहेत. यात कापसाच्या शेतात अगदी गुडघाभर पाणी साचले असल्याने संपूर्ण कापूस पाण्यात आहेत. यामुळे झाडावरील बोन्ड खराब झाले आहे. तर कैरी देखील सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशी परिस्थिती असताना देखील कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर येत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा बांधावर येऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आवाहन केले जात असून नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कर्यायावर काळ वांगण फासणारा असल्याचा इशारा दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.