Farmer
Farmer 
ऍग्रो वन

युरीया खतासाठी शेतकऱ्यांच्या सकाळपासूनच रांगा; जाणवतोय खताचा तुटवडा

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने पेरण्या कमी झाल्या आहे. असे असले तरी युरिया खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळी- सकाळी नवापूर शहरातील कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावल्याचे दिसून आले. (nandurbar-news-Farmers-have-been-queuing-for-urea-fertilizer)

यंदा पाऊस लांबला आहे. पाऊस लांबल्‍याने पेरणी पुर्णपणे झालेल नाही. उल्‍हाळ्यात बागायती पेरणी केलेले शेतकरी आता पाऊस पडल्‍यामुळे पिकांना खत देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मागणी वाढली असल्‍याने तुलनेत खतांचा तुटवडा जाणवत आहे.

मिळतोय दोनच बॅगा युरीया

सदर कृषी सेवा केंद्राकडून तीनशे रुपये प्रति बॅगप्रमाणे एका शेतकऱ्याला दोन बॅगा वाटप सुरू होते. रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांपैकी ५० ते ६० शेतकऱ्यांनाच उपलब्ध युरिया खत मिळाले. उर्वरित शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या युरिया खताची मागणी लवकर पूर्ण करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आतापासूनच जाणवतोय तुटवडा

दरवर्षी शासकीय कृषी शेतकी संघाच्या मार्फत शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा केला जातो. परंतु यंदा शेतकी संघांमध्ये खत उपलब्ध झाले नसल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जाते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये युरिया खताचा तुटवडा भासत असल्याने युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

SCROLL FOR NEXT