Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : पाऊस नसल्याने सोयाबीन, मूंग गेला वाया; शेतकऱ्यांनी फिरविला नांगर

Nandurbar News : पाऊस नसल्याने सोयाबीन मूंग गेला वाया; शेतकऱ्यांनी फिरविला नांगर

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: राज्यातील कोणत्याच भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यानुसार नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील मागील २५ दिवसापासून पाऊस नसल्याने सोयाबीन, मुंग, उडीद इतर पिकांचे उत्पादन शून्य झाले आहे. परिणामी (Farmer) शेतकऱ्यांनी पिकांवर रोटाव्हिटर फिरवून जनावरांना चारा केला आहे. दुसरीकडे अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे पपई आणि केळीच्या बागांना पाणी देता येत नाही. यामुळे बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुंग, उडीद, चवळी, तूर यासारख्या कडधान्य पिकांची लागवडी केली आहे. मात्र फुल धारणा आणि फळ धारणाच्या वेळेस पाऊस (Rain) नसल्याने पिकांचे उत्पादन येण्याची शक्यता कमीच आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पीक जळत आहे. यामुळे शेतकरी आता पिकांवर रोटाव्हिटर फिरवून गुरांना चारा देण्याच्या तयारीत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर केले आहे. 

भारनियमनाचे संकट 
एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याला कारण म्हणजे महावितरणकडून केले जात असलेले अनियमित भारनियमन. पाणी देता येत नसल्याने केळी आणि पपई पिकांवरही संकट आले आहे. पाणी असूनही पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप होत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज देऊ शकत नसतील तर हे सरकार काय कामाचे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सरकारने शेतकरी हिताच्या गप्पा मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना दिलासादायक विद्युत पुरवठा करावा; अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT