Bogus Seeds Saam tv
ऍग्रो वन

Bogus Seeds : बोगस एचटीबीटी बियाणे जप्त; नंदूरबार कृषी विभागाची कारवाई

Nandurbar News : खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नंदूरबार : गुजरात राज्यातुन महाराष्ट्र राज्यात एचटीबीटी बियाणे आणण्यास बंदी आहे. असे असताना हे बियाणे (Nandurbar) विकण्याचा उद्देशाने येत असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाने कारवाई करत ३० लाख रुपये किमतीचे बोगस बियाणे जप्त केले आहे. 

खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बोगस बियाणे (Bogus Seeds) विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक तसेच तालुकास्तरावर एक असे सात भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. त्यानुसार १ मे रोजी दुपारी नंदूरबार येथील (Agriculture Department) कृषि विभागाला गुजरात राज्यातून एचटीबीटीची बोगस बियाणे राज्यात खापरमार्गे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचुन खापर नजीक बोगस बियाणे वाहतूक करणारा ट्रक पकडला.

सदरची कारवाई विभागातील सर्वात मोठी व हंगामातील पहिलीच असल्याने बोगस कृषी बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यावेळी पथकाला बोगस एचटीबीटी योध्दा नामक बोगस बियानाचे १ हजार पाकीटे व वाहतूक करणारे वाहन जप्त केले असून एकुण तिस लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच वाहन चालकावर (Akkalkuwa) अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT