Nanded Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Success Story : आंतरपिकातून लाखोंची कमाई; शेतकऱ्याने केळीत खरबुजाची केली लागवड

Nanded News : सध्या केळीचे पिक लहान असल्याने आंतरपीक घेणे शक्य असल्याच्या विचारातून बालाजी राठोड यांनी खरबूज लागवड केली. आता खरबूज तोडणीवर आले आहे.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : शेतीतून पिकांचे उत्पन्न घेताना अनेक शेतकरी पारंपरिक शेती न करता वेगवेगळे प्रयोग करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेत असतात. असाच वेगळा प्रयोग करत केली लागवड केल्या शेतात आंतर पिकातुन लाखो रुपयांचे उत्पन्न यातून मिळविल्याचे यशस्वी प्रयोग (Nanded) नांदेड जिल्ह्यातील एका (Farmer) शेतकऱ्याने केला आहे. (Tajya Batmya)

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लहान तांडा येथील बालाजी राठोड या अल्पभूधारक शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. शेतात लागवड केलेल्या केळी पिकात आंतरपीक म्हणून दोन एकरावर खरबुजाची यशस्वी लागवड केली आहे. सध्या केळीचे पिक (Banana Crop) लहान असल्याने आंतरपीक घेणे शक्य असल्याच्या विचारातून बालाजी राठोड यांनी खरबूज लागवड केली. आता खरबूज तोडणीवर आले आहे. महिना- दीड महिन्याने खरबूजची तोडणी पूर्ण झाल्यानंतर काढले जाईल. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चार लाखाचे उत्पन्न अपेक्षित 

आता खरबूज तोडणीला आले आहे. या शेतकऱ्याला खरबूज लागवडीतून दोन एकरामध्ये चार लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. तर केळीचे चांगले उत्पन्न मिळण्याची देखील आपेक्षा आहे. शेतात खरबुजाची चांगली फळधारणा झाली असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT