अकोला : राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 'नापसंती'चे ठिकाण बनले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी (IAS) येथे येण्यास इच्छुकच नसल्याचे वारंवार स्पष्ट होऊ लागले आहे. Mahabeej Not Getting Managing Director
डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी(Anil Bhandari) यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी १७ फेब्रुवारीला महाबीज मुख्यालय गाठले. आल्या आल्या कामकाजाचा आढावा घेतला.
नंतर अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) सेल्स टॅक्स (Sales Tax) विभागात नियुक्ती झाल्याचे आदेश धडकले आहे. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार(Rahul Rekhawar) यांची नियुक्ती केली गेली आहे. यालाही आता महिना लोटला आहे. मात्र रेखावार हे सुद्धा अद्याप रुजू झालेले नाहीत. कुणीही पूर्णवेळ अधिकारी नसल्याने सध्या या पदाची अतिरिक्त जबाबदारी जी.श्रीकांत(G. Srikanth) औरंगाबादेतून सांभाळत असल्याचे समजले आहे. Mahabeej Not Getting Managing Director
नियुक्ती केलेले रेखावार यांची इच्छा नसल्याची चर्चा महामंडळाच्या मुख्यालयात ऐकायला मिळत आहे. आता हंगामापूर्वी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती होऊ शकते. नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांना इतके नासपसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहेत.
तर भाजप आमदार रणधीर सावरकर(BJP MLA Randhir Savarkar) यांनी देखील या बाबत राज्य सरकार वर टीका केली आहे. राज्य सरकार या अधिकाऱ्यांचा लाड पुरवत असल्याचा आरोप केलेला आहे. हंगाम जवळ आला असताना अधिकारी येण्यास तयार नसल्याने महाबीजचे बियाणे च नियोजन कसे होणार हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. Mahabeej Not Getting Managing Director
Edited By-Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.