Farmer
Farmer Saam tv
ऍग्रो वन

कारखान्याला ऊस न गेल्याने शेतकऱ्याचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

दीपक क्षीरसागर

लातुर : सध्याला ऊसाचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मोरतळवाडी येथील शेतकरी रामदास पाटील यांचा शेतातील ऊस विकास कारखान्याने घेऊन न गेल्याने जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी (Police) वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला आहे. (latur news farmer Attempt to take the water of the as the sugarcane did not reach the factory)

लातुर (Latur) जिल्ह्यात १३ साखर कारखाने असून ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस गाळपाला आणला. पण जिल्ह्यातील ऊस (Sugarcane) शिल्लक राहिला आहे. शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी अनेकदा चकरा मारल्या. पण ऊस गाळप करण्यासाठी गेला नाही. रामदास पाटील यांचा विकास कारखान्याने ऊस घेऊन न गेल्यामुळे रामदास पाटील यांनी आज (15 मे) तिरु प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी वाचविले प्राण

यावेळी वाढवणा पोलिसांनी रामदास पाटील या शेतकऱ्यांला (farmer) जलसमाधी घेताना सदरील शेतकऱ्यांचे प्राण वाचवले व शेतकऱ्यांना वाढवना पोलिसांनी ताब्यात घेवून वाढवणा पोलीस ठाण्यात नेण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांनी महविकास आघाडीवर सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप केला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक; तीन कॅफेशॉप फोडले

High Calcium Foods : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेले पदार्थ; लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अन् हाडं होतील मजबूत

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Buldhana: ज्वारी खरेदीच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप, नोंदणी कार्यालयात तुडुंब गर्दी

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

SCROLL FOR NEXT