Jalgaon News
Jalgaon News Saam Tv
ऍग्रो वन

Jalgaon: केळी ने भरलेली मालगाडी तब्बल १२ तास स्टेशनवरच उभी; शेतकऱ्यांचे नुकसान

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव - केवळ चालक नसल्याने केळीने भरलेली रेल्वे मालगाडी सावदा स्टेशनवर तब्बल १२ तास उभी असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) रेल्वे प्रशासनाचे रोष व्यक्त करत थेट रेल्वे (Railway) मंत्रालयातच या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता चालक उपलब्ध झाल्यानंतर गाडी दिल्लीकडे रवाना झाली.

दरम्यान याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मालगाडीत रात्रीच लाखो रुपयांची केळी भरण्यात आली होती. चालक नसल्याने मालगाडीला विलंब झाल्याने लाखो रुपयांच्या केळीच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा ही प्रश्न यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील पाहा -

रात्री उशिरापर्यंत लोड करण्याचं काम केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून चालू होतं व रात्री बारा वाजता ते पूर्ण होऊन एक तासात सावदा रेल्वे स्टेशनवरून गाडी निघायला हवी होती. मात्र ती तब्बल १२ तास चालक नसल्याने रेल्वे स्टेशनवर उभी होती. केळीच्या भरलेली रेल्वे गाडी 12 तास सावदा स्टेशनवर उभी होती. हे नाशिवंत फळ असल्याने ते जास्त वेळ टिकत नाही.

या गाडीतील केळी खराब होवुन तिला कमी भाव मिळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल व याला रेल्वे प्रशासनच जबाबदार राहील असे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेवटी स्थानिक पत्रकारासह शेतकऱ्यांनी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर साडे बारा वाजता केळीची भरलेली मालंगाडी दिल्लीकडे कडे रवना झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

Eknath Shinde Speech : 'धणुष्यबाण गेला पंजा आला'; कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Bus Fire: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT