Farmer 
ऍग्रो वन

जळगावात नवा प्रयोग..करवंदाची शेती फुलवली अन्‌ लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न

जळगावात नवा प्रयोग..करवंदाची शेती फुलवली अन्‌ लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्‍ह्यात करवंदाची शेती हा विषय दूरच आहे. परंतु, नवीन प्रयोग करून टप्‍प्‍याटप्‍प्‍याने लागवड करत बारा एकर क्षेत्रात करवंदाची शेती फुलविली. यातून लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न शेतकरी मिळवत आहे. (jalgaon-news-New-experiment-farmer-Taxation-flourished-and-income-of-lakhs)

चिंचखेडा बुद्रुक (ता.मुक्ताईनगर) येथील मंगेश जयवंत पाटील या शेतकऱ्याने दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही बारा एकर शेतीवर करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न या शेतकऱ्यांनी घेतले आहे. या शेतकऱ्याची करवंद दिल्ली आणि कलकत्ता येथील बाजारपेठेत व्यापाराच्या माध्यमातून जात असते.

दोन मजूर कामाला

जळगाव जिल्ह्यात करवंदाची लागवड करणारे मंगेश पाटील हे एकमेव शेतकरी आहे. मंगेश पाटील यांनी ८ हजार करवंदाची वृक्ष लागवड केली आहे. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव यावर येत नसून द्राक्षांसारखे पिक आपण घेऊ शकतो. इतर शेतकऱ्यांनी याकडे वळावे; असे आवाहन या शेतकऱ्यांने केले आहे. त्‍यांच्‍या शेतात परिसरातील दोनशे मजूर नेहमी राबत असतात.

करवंदाच्‍या शेतीचा आदर्श

एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती पावसाळाही कमी प्रमाणात होत असल्यामुळे रब्बी, खरिपाचे पिकांचे पाहिजे तसे उत्पन्न सध्या येत नाही. अनेक शेतकरी सध्या हवालदिल आहेत. अशातच या शेतकऱ्याने करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतल्यामुळे इतर शेतकऱ्यांसमोर देखील एक नवीन आदर्श यानिमित्ताने ठेवला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करवंदाची लागवड करावी असे आवाहन देखील या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT