Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेत टोकाचे पाऊल; तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील वाकडी येथील सुनील वामन पाटील (वय ४०) असे मयत तरुणाचे नाव आहे. शेती काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.

Rajesh Sonwane

जळगाव : शेती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुण शेतकऱ्याने जोड व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडू शकत नसल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत वाकडी येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

जळगाव (Jalgaon News) तालुक्यातील वाकडी येथील सुनील वामन पाटील (वय ४०) असे मयत तरुणाचे नाव आहे. शेती काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्याने व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता येत नसल्याच्या विवंचनेत तो होता. याच विवंचनेतूनच त्याने २३ ऑक्टोबरला शेतामध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला. 

दरम्यान कुटुंबीयांनी सुनील यास तात्काळ (Jalgaon Medical collage) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आला आहे. सुनील पाटील यांचा यांच्या मृत्यूने वाकडी गावामध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार भारताचे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर रोजी घेतील शपथ

Congress First Candidate List : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीसांविरोधात शिलेदार उतरवला, वाचा लिस्ट

INDw vs NZw ODI: भारतीय महिला संघाकडून न्युझीलंडला धोबीपछाड; ५९ धावांनी जिंकला सामना

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारे 5 फॅक्टर; राज ठाकरे आणि जरांगेंचा कुणाला फटका? पाहा व्हिडिओ

Jharkhand Election: झारखंडात 'या' पाच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; पराभूत झाले तर संपेल राजकारणातील करिअर

SCROLL FOR NEXT