शेतकऱ्याचा पीक विमा न देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा झटका
शेतकऱ्याचा पीक विमा न देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा झटका अॅड. जयेश गावंडे ...
ऍग्रो वन

शेतकऱ्याचा पीक विमा न देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा झटका

अॅड. जयेश गावंडे

अकोला : शेतकरी म्हटले की अस्मानी संकट निश्चितच आहे. कारण कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळाचा शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी सामना करावा लागतो. म्हणूनच केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितार्थ पंतप्रधान पीक विम्याच संरक्षण शेतकऱ्यांना दिल आहे. मात्र, विमा काढून विम्याची पूर्ण रक्कम भरूनही अनेक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहतात, असाच प्रकार अकोल्यातही घडला आहे.

हे देखील पहा-

अकोल्यातील शेतकरी रामकृष्ण जळमकार आणि महिला शेतकरी ज्ञानेश्वरी गावंडे यांनी 2017 च्या खरीप पिकासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये पीक विमा काढला होता. नेमकं त्याच वर्षी या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. रामकृष्ण जळमकार यांच्या एक हेक्टर 20 आर सोयाबीन 40 आर मुंग आणि 40 आर उदित पिकांचे नुकसान झाले होते.

तर ज्ञानेश्वरी गावंडे या महिलेच्या शेतातील एक हेक्टर 99 आर सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. परंतु, विमा कंपनीने या शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ दिला नाही. म्हणून या शेतकऱ्याला ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे न्यायासाठी धाव घ्यावी लागली आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोगाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देत, शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: पिकलेली की कच्ची कोणती केळी आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

kitchen Hacks: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत

Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT