शेतकऱ्याचा पीक विमा न देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा झटका अॅड. जयेश गावंडे ...
ऍग्रो वन

शेतकऱ्याचा पीक विमा न देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा झटका

ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळाचा शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी सामना करावा लागतो

अॅड. जयेश गावंडे

अकोला : शेतकरी म्हटले की अस्मानी संकट निश्चितच आहे. कारण कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळाचा शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी सामना करावा लागतो. म्हणूनच केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितार्थ पंतप्रधान पीक विम्याच संरक्षण शेतकऱ्यांना दिल आहे. मात्र, विमा काढून विम्याची पूर्ण रक्कम भरूनही अनेक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहतात, असाच प्रकार अकोल्यातही घडला आहे.

हे देखील पहा-

अकोल्यातील शेतकरी रामकृष्ण जळमकार आणि महिला शेतकरी ज्ञानेश्वरी गावंडे यांनी 2017 च्या खरीप पिकासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये पीक विमा काढला होता. नेमकं त्याच वर्षी या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. रामकृष्ण जळमकार यांच्या एक हेक्टर 20 आर सोयाबीन 40 आर मुंग आणि 40 आर उदित पिकांचे नुकसान झाले होते.

तर ज्ञानेश्वरी गावंडे या महिलेच्या शेतातील एक हेक्टर 99 आर सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. परंतु, विमा कंपनीने या शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ दिला नाही. म्हणून या शेतकऱ्याला ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे न्यायासाठी धाव घ्यावी लागली आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोगाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देत, शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT