अवेळी पावसाने शेतकरी हतबल; 1200 हेक्टरपेक्षा अधिकच्या रब्बी पिकांचे नुकसान राजेश काटकर
ऍग्रो वन

अवेळी पावसाने शेतकरी हतबल; 1200 हेक्टरपेक्षा अधिकच्या रब्बी पिकांचे नुकसान

काल झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर या पावसाने शेतातील संपूर्ण ज्वारीचं पिकं आडवं झालं आहे.

राजेश काटकर

परभणी : जिंतूर तालुक्यातील झरी शिवारात काल झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर या पावसाने शेतातील संपूर्ण ज्वारीचं पिकं आडवं झालं आहे. त्यामुळे ऐन जोमात आलेली पिकांचं पावसाने नुकसान झाल्य़ाने आता जगायचा कसं? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

आधीच लॉकडाऊनमुळे (Lockdown) शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. अशातच अवेळी पडलेल्या पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शिवाय काल पडलेल्या पावसामुळे तुरीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे सद्यस्थितीला तुरीचे पीक कापून टाकल्यामुळे जमिनीवर आडवे असलेल्या पिकांना या पावसामुळे बाधा निर्माण झाली आहे.हा पाऊस जिंतूर तालुक्यातील झरी सह मिर्झापूर, साडेगाव, संबर, सावंगी, जलालपूर मांडवा डिग्रस पिंपळा नांदापूर आदी गावांना असल्यामुळे सदरील गावातील बाराशे हेक्टरच्या वरती ज्वारी, गहू, हरबरा व काढून ठेवलेल्या तुरीचे नुकसान झाले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: इकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, तिकडे मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंच्या आमदाराला 'प्रपोजल'; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; आता पुण्यात FDA ने टाकली धाड

Sunday Horoscope : पार्टनर साथ देईल, लाईफस्टाईल बदलेल; ५ राशींच्या लोकांच्या जीवनातील समस्या क्षणात होतील दूर

MBBS प्रवेशाच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा, बोगस अॅडमिशनच्या रॅकेटचा पर्दाफाश

Operation Tiger : ऑपरेशन टायगरचा मुहूर्त ठरला? महाराष्ट्रातील २ नेत्यांनी थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं, नेमकी वेळही सांगितली

SCROLL FOR NEXT