संदिप नागरे
हिंगोली: कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे, तर कधी शासनाच्या धोरणामुळे मालाला कमी भाव मिळून शेतकरी नेहमी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र यंदाच्या वर्षी, हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) सोयाबीन उत्पादक (Soyabean Crop) शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण अडीच लाख हेक्टरवर लागवड झालेल्या सोयाबीन पिकाला आज उचांकी दर मिळाल्याने, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात नव्याने आलेल्या सोयाबीनला, हिंगोलीच्या बाजारसमितीमध्ये, तब्ब ११०२१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
शेतकरी गजानन वसू यांचे हे सोयाबीन आज विक्री करण्यात आले, नेहमी बाजार समितीमध्ये, शेतकऱ्यांनी कष्ट करून, पिकवकेल्या मालाला कमी भाव मिळत असे, मात्र आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळून, शेतकऱ्याचे कष्टाचे चीज झाल्याने , हिंगोलीच्या बाजार समिती प्रशासनाने, शेतकरी गजानन वसू यांचा शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करत, त्याचे तोंड गोड केले आहे.
विशेष म्हणजे हा शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना केवळ तीन क्विंटल येवढेच सोयाबीनचे उत्पादन झाले होते, मात्र भाव चांगला मिळाल्याने या सोयाबीन विक्री मधून त्यांना तीन क्विंटलचे, तेहतीस हजार साठ रुपये मिळाले आहेत. दरम्यान येत्या महिनाभरात जिल्ह्यात सरसकट सोयाबीन पीक काढणीला येणार असल्याने आजचे भाव कायम राहिले तर नक्कीच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.