अतिवृष्टीचा फटका; शेतकऱयाने तोडून टाकली केळीची बाग!
अतिवृष्टीचा फटका; शेतकऱयाने तोडून टाकली केळीची बाग! संतोष जोशी
ऍग्रो वन

Nanded : अतिवृष्टीचा फटका; शेतकऱयाने तोडून टाकली केळीची बाग!

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : यंदा अतिवृष्टी आणि करपा रोगामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील एका केळी उत्पादक शेतकऱ्याने बागेतील दिड हजार केळीची रोपटी अक्षरशः तोडून टाकली. शैलेश लोमटे असे या आर्थिक संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे.

हे देखील पहा :

लोमटे यांनी केळी लागवडीवर एक लाख रुपये खर्च केला आणि त्यांना तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं मात्र करपा आणि अतिवृष्टीनं संपूर्ण केळी खराब होत असल्याने केळीची संपुर्ण रोपटी तोडून टाकली आहेत. जिल्हयातील अर्धापूर, मूदखेड, हदगाव, भोकर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते.

अतिवृष्टीमुळे केळीचे मोठे नुकसान होत असतानाच करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केळी परिपक्व होण्याअगोदरच पिवळी पडत असल्याने शेतकरी हवालदील झालाय. लोमटे यांच्या प्रमाणे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पिकवलेली केळीची बाग उद्धवस्त कारण्याशिवाय पर्याय उरला नाही. केळी उत्पादक शेतकरी शासनाकडे मदतीची मागणी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT