बोगस खरेदीखत प्रकरणी; देवणीचे दुय्यम निबंधकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
बोगस खरेदीखत प्रकरणी; देवणीचे दुय्यम निबंधकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल... दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

बोगस खरेदीखत प्रकरणी; देवणीचे दुय्यम निबंधकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल...

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातुर : लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यामधील धनगरवाडी, जवळगा या ठिकाणी शेत जमीनीचा दुसराच व्यक्ती उभा करून, बोगस खरेदीखत केल्या प्रकरणी देवणीचे दुय्यम निबंधक यांच्यासह ४ जणांविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी देवणी यांच्या आदेशानुसार देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

यामध्ये फिर्यादी हिचे वडील राजाराम नागप्पा काकनाटे हे दिनांक १२ एप्रिल २०२१ दिवशी बालाजी हॉस्पिटल वलांडी या ठिकाणी अॅडमीट असताना चौघे आरोपी फौजदारीपात्र कट करुन आणि संगणमत करुन, फिर्यादीचे वडीलांचे जमीन सर्वे नं.१२४/२ मध्ये फिर्यादीचा हिस्सा आहे. हे माहीत असताना तरीदेखील अज्ञात व्यक्तीला राजाराम या नावानी उभा करून, सदर जमिनीचे दुय्यम निबंधक कार्यालय देवणी या ठिकाणी खोटे व बोगस खरेदीखत तयार करुन ते खरे म्हणुन वापरले आहे.

या प्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी देवणी यांचे आदेशान्वये कलम १५६(३) सी.आर.पी.सी प्रमाणे मिनाक्षी धनाजी बोडके राहणार धनगरवाडी, जवळगा यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार रामदास नामदेव काकनाटे, हरि व्यंकटराव मेळकुंदे, पांडुरंग बापुराव चिंचोले, प्रमोद येशमवार दुय्यम निबंधक देवणी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT