Osmanabad News Saam Tv
ऍग्रो वन

जमिनीचा पोत बिघडला; शेतकऱ्यांचे माती परीक्षणाकडे दुर्लक्ष

उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाख शेतकरी आहेत. तर पाच लाख 27 हजार हेक्टर वरती पीक उत्पादन घेतलं जातं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - शेतातील उत्पन्न घटण्याठी विविध कारणे आहेत त्यातील प्रमुख कारण म्हणजे आपल्याला जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण किती हे माहिती नसणे वर्षानुवर्षे रासायनिक खतामुळे जमीन नापीक होत चाललेली आहे. तर दुष्काळ (Drought) आणि अतिवृष्टीने जमिनीचा पोत खराब होतो आहे. मात्र तरी ही शेतकऱ्यांचे (Farmer) आणि प्रशासनाचे माती परीक्षण लाकडे दुर्लक्षच आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाख शेतकरी आहेत. तर पाच लाख 27 हजार हेक्टर वरती पीक उत्पादन घेतलं जातं. मात्र यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप एकदाही माती परीक्षण करून घेतलं नाही. त्यात काही बागायतदार शेतकरी आहेत ज्यांनी काही प्रमाणात आपल्या मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, वर्षभरात केवळ 9 हजार 124 शेतकऱ्यांनीच माती परीक्षण करून घेतले आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्रात खडकांपासून काळी माती बनण्याचे प्रमाण अधिक आहे. जमिनीमध्ये नत्र,स्फुरद आणि पालाश ह्या घटकाचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणे आहे. काही ठिकाणी पालाश भरपूर आढळतो तर स्पुरसचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तर मध्यम स्वरूपात नत्र आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य तपासणी केली आणि या प्रत्येक घटकांचे माहिती जाणून घेतली तर जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. तर उत्पादन वाढीत भर पडते मात्र यातील बहुतांश शेतकऱ्यांना तपासणी केली जाते आणि करावीच लागते याची माहिती नाही तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तपासणी केली मात्र अहवालच मिळाला नसल्याचे तक्रारी केल्या जातात.

भौगोलिक अंतरामुळे देखील शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यासाठी शक्य होत नाही जिल्ह्यात माती परीक्षणाच्या चार लॅब आहेत. दोन खाजगी तर दोन सरकारी. मात्र, तरीदेखील माती परीक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी त्यातही उमरगा, लोहारा, भूम, परंडा या तालुक्यातील शेतकरी माती परीक्षण कडे वळले नाहीत. शेतात पेरणी केली की खाताचा दुकानातून वेगवेगळ्या कंपनीचे ब्रांडेड खते खरेदी केली जातात जमिनीला आवश्यक नसणाऱ्या खतांचा मारा पिकांवरती आणि जमिनीवर केला जातो. त्यामुळे उत्पन्नात घट होते. चार लॅब मधून साधारण दिवसाला 50 सॅम्पल घेण्याची क्षमता आहे. यासाठी 35 रुपयांची फीस आहे. मात्र लॅब आणि शेतकरी यांच्यातील अंतर मोठे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

SCROLL FOR NEXT