शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर 
शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर  Saam Tv
ऍग्रो वन

शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर 

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद  - अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर आहे. गेल्या पंधरवड्यापासून राज्य सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्याशिवाय विमा कंपनीकडून पिक विम्याच्या परताव्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. त्या रकमेवर डोळा ठेवून शेतकऱ्यांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी सायबर गुन्हेगार सक्रिय होतील, अशी भीती आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे अशा सायबर गुन्हेगारांवर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची नजर असणारच आहे, तसंच पोलिसांनीही शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना बँकेतील व्यवहाराची प्रक्रिया फारशी माहिती नसते. त्याचाच फायदा सायबर भामटे घेण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांना फोन करायचा आणि त्यांच्या अकाउंटची माहिती घ्यायची किंवा मोबाईलवर ओटीपी पाठवून तो ओटीपी मागून घ्यायचा आणि पैसे लंपास करतील याची भीती सध्या वाटू लागली आहे.

आधीच मराठवाड्यातला शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात सायबर गुन्हेगार आता सक्रिय होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून सगळ्यांनीच सतर्क राहिलं पाहिजे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : धाराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली

Ridge Gourd benefits: वजन आणि मधुमेहाच्या व्यक्तींसाठी 'ही' भाजी ठरते वरदान

Akola Crime News: प्रेमात अडसर ठरत होती बायको; नवऱ्याने गाठला विकृतीचा कळस, मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

Kalyan News: 'राजकारणातून संन्यास घ्यायचा, नाहीतर संपवून टाकेन...' शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Buldhana Accident : भरधाव दुचाकी बसला धडकली; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT