शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर  Saam Tv
ऍग्रो वन

शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर 

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद  - अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता सायबर भामट्यांची नजर आहे. गेल्या पंधरवड्यापासून राज्य सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्याशिवाय विमा कंपनीकडून पिक विम्याच्या परताव्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. त्या रकमेवर डोळा ठेवून शेतकऱ्यांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी सायबर गुन्हेगार सक्रिय होतील, अशी भीती आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे अशा सायबर गुन्हेगारांवर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची नजर असणारच आहे, तसंच पोलिसांनीही शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना बँकेतील व्यवहाराची प्रक्रिया फारशी माहिती नसते. त्याचाच फायदा सायबर भामटे घेण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांना फोन करायचा आणि त्यांच्या अकाउंटची माहिती घ्यायची किंवा मोबाईलवर ओटीपी पाठवून तो ओटीपी मागून घ्यायचा आणि पैसे लंपास करतील याची भीती सध्या वाटू लागली आहे.

आधीच मराठवाड्यातला शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात सायबर गुन्हेगार आता सक्रिय होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून सगळ्यांनीच सतर्क राहिलं पाहिजे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT