दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्या विनोद जिरे
ऍग्रो वन

दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील घटना

विनोद जिरे

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीने पहिला बळी घेतल्याचं समोर आलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतीसह पीक वाहून गेले, तर बँकेने जुने कर्ज थकीत असल्याने नवीन कर्ज नाकारले आहे. यामुळे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून एका 55 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग या ठिकाणी घडली आहे.

हे देखील पहा-

अतिवृष्टी नुकसानीचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. भाऊसाहेब दशरथ पांढरे (वय- 55) वर्ष रा. सिरसमार्ग, ता. गेवराई असे मयताचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. घर बांधणीसाठी त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. शिवाय सेंट्रल बँकेचे पीक कर्जही घेतले होते. शेतात त्यांनी सोयाबीन आणि कापसाची लागवड केली होती.

मात्र, अतिवृष्टीमुळे पिकासह शेती खरडून वाहून गेली. त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नैराश्येतून त्यांनी दुपारच्या सुमारास घरामागील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान नवीन कर्ज मिळावे यासाठी भाऊसाहेब पांढरे हे बँकेत खेटे मारत होते. मात्र, जुने कर्ज थकीत असल्याने बँकेने नवीन कर्जास नकार दिला होता. दुपारी बँकेतून येताच त्यांनी गळफास घेतला आहे. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: अर्थसंकल्पाआधी सोनं स्वस्त! १० तोळ्यामागे ₹८६,२०० ची घट, वाचा 22k, 24k गोल्डची प्रति तोळा किंमत

Kitchen Hacks : फ्रीज घाणेरडा आणि पिवळा पडलाय? 'या' टिप्स वापरून पुन्हा करा नव्यासारखा चकचकीत

IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता

Dark Underarms Tips: काखेतला काळवटपणा घालवण्यासाठी या 5 टिप्स आजपासूनच फॉलो करा

NCP Reunion: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांची इच्छा; १२ तारखेला निर्णय जाहीर होणार होता, शरद पवारांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT