दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्या विनोद जिरे
ऍग्रो वन

दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील घटना

विनोद जिरे

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीने पहिला बळी घेतल्याचं समोर आलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतीसह पीक वाहून गेले, तर बँकेने जुने कर्ज थकीत असल्याने नवीन कर्ज नाकारले आहे. यामुळे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून एका 55 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग या ठिकाणी घडली आहे.

हे देखील पहा-

अतिवृष्टी नुकसानीचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. भाऊसाहेब दशरथ पांढरे (वय- 55) वर्ष रा. सिरसमार्ग, ता. गेवराई असे मयताचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. घर बांधणीसाठी त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. शिवाय सेंट्रल बँकेचे पीक कर्जही घेतले होते. शेतात त्यांनी सोयाबीन आणि कापसाची लागवड केली होती.

मात्र, अतिवृष्टीमुळे पिकासह शेती खरडून वाहून गेली. त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नैराश्येतून त्यांनी दुपारच्या सुमारास घरामागील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान नवीन कर्ज मिळावे यासाठी भाऊसाहेब पांढरे हे बँकेत खेटे मारत होते. मात्र, जुने कर्ज थकीत असल्याने बँकेने नवीन कर्जास नकार दिला होता. दुपारी बँकेतून येताच त्यांनी गळफास घेतला आहे. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT