अतिवृष्टीने घेतला आणखी एक बळी; 34 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या विनोद जिरे
ऍग्रो वन

अतिवृष्टीने घेतला आणखी एक बळी; 34 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अतिवृष्टी, गतवर्षीचा पीकविमा नाही त्यात कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून केली आत्महत्या

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात परत एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगावमध्ये, 34 वर्षीय तरुण शेतकऱ्याने, गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. सिद्धेश्वर धर्मराज फरताडे, (वय- 34) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच नाव आहे.

हे देखील पहा-

सिद्धेश्वर फरताडे हे अल्पभूधारक शेतकरी तथा ऊसतोड कामगार होते. दरवर्षी ते शेती आणि ऊसतोडी करत आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित होते. यंदा शेतात सोयाबीन अन पपई आहे. यातील सोयाबीन अतिवृष्टीने गेली, तर पपईवर कीड आल्याने ते देखील गेले. त्यामुळे अतिवृष्टीने झालेलं नुकसान अन त्यात कर्जबाजारीपणा, याचं परिस्थितीच्या समोर हार मानली आणि राहत्या घरी गळफास घेऊन स्वतः चे जीवन संपविले आहे.

या प्रकरणाची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मयत सिद्धेश्वर फरताडे यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत असल्याने, प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT