Farmer 
ऍग्रो वन

पिकांवरील रोगाचे शेतकऱ्यांसमोर संकट

पिकांवरील रोगाचे शेतकऱ्यांसमोर संकट

भूषण अहिरे

धुळे : पावसाअभावी पहिलेच पीक वाया गेल्याने दुबार पेरणी करावी लागली. यानंतरही आता शेतकऱ्यांसमोर पिकावर रोगावर नियंत्रण मिळवण्याचे नवीन संकट उभे आहे. पाऊस नाही त्‍यात ढगाळ वातावरण असल्‍याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. (dhule-news-no-rain-and-Crisis-of-crop-disease-in-front-of-farmers)

धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी देखील समाधानकारक हजेरी लावलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केलेले पीक संपूर्ण वाया गेले आहे. त्यानंतर दुबार पेरणी केल्यानंतरही जसं तसं पीक वाढी लावल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर रोगाचा प्रादुर्भावाचं संकट उभा टाकला आहे.

दुबार पेरणीचा खर्च आता महागडी औषधी

दुबार पेरणी केल्यानंतर ही रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता महागडे औषध फवारावे लागत आहेत. एवढं सगळं केल्यानंतर देखील उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्च तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडेल का असाच प्रश्न शेतकऱ्याला भेडसावू लागला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी गोड! मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 1 हजार 566 कोटींचा निधी|VIDEO

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Success Story: इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन, बीडच्या लेकाने उभारली स्वतःची कंपनी; Canvaला देतेय टक्कर

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT