Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : दुष्काळ जाहीर करा; हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर पायी मोर्चा

Dhule News : धुळे व नंदुरबार जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस पडला नाही. यामुळे दोन्ही जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

भूषण अहिरे

धुळे : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने दुष्काळ (Dhule) सदृश्य परिस्थिती निर्माण झाले आहे. यामुळे धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्यावतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. हजारो (Farmer) शेतकरी यात सहभागी होऊन मंत्रालयाकडे पायी निघाले आहेत. (Latest Marathi news)

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात यंदा अपेक्षित (Rain) पाऊस पडला नाही. यामुळे दोन्ही जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने मात्र दुष्काळ जाहीर करताना काही तालुक्यांचाच समावेश केला आहे. परंतु संपूर्ण जिल्हाच दुष्काळी असून राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. यानुसार (Nandurbar) सत्यशोधक शेतकरी सभेच्या माध्यमातून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोपर्यंत माघार नाही 

हजारो शेतकरी पायी मोर्चा घेऊन मंत्रालयाच्या दिशेने नंदुरबारहून निघाले असून आज रात्रीच्या मुक्कामानंतर धुळ्यातून पुन्हा पुढे मार्गस्थ झाले आहेत. हे पायी निघालेले मोर्चेकरी बिऱ्हाड सोबत घेऊन धुळे आणि नंदुरबार जिल्हा दुष्काळ जाहीर करावा; या मागणीसाठी निघाले आहेत. राज्य सरकार जोपर्यंत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मोर्चेकर्‍यांनी घेतली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ

Sinhagad Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, सिंहगड किल्ल्याबद्दलची 'ही' रहस्ये अनेकांना माहितीच नसतील

Malshej Ghat : माळशेज घाट मार्ग पुर्ण बंद; पर्यायी मार्गांवर रात्रभर वाहतूक कोंडी, पर्यटकांचे हाल

Tharala Tar Mag! : प्रियाचा डाव फसणार; सायलीची तुरुंगातून सुटका होणार, 'ठरलं तर मग!' मध्ये येणार 'हा' मोठा ट्विस्ट|VIDEO

Ayurveda Benefits : तुळशीच्या पानांचा रस कानात का टाकला जातो? 'ही' गुणकारी आयुर्वेदिक कारणे वाचा

SCROLL FOR NEXT