Tanaji Sawant Saam tv
ऍग्रो वन

Tanaji Sawant News : तर बँकांवर एफआयआर दाखल करा; पीक कर्ज वाटपावरून मंत्री तानाजी सावंतांनी दिले आदेश

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच पीक कर्जाचे वाटप झाले आहे. पीक कर्ज वाटपावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत चांगलेच आक्रमक झाले असून पिक कर्ज वाटपाचे टार्गेट ३१ जुलैपर्यंत पूर्ण न झाल्यास बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. 

धाराशिव (Dharashiv) येथे शेतकऱ्यांना पीक कर्ज अजूनही उपलब्ध झालेले नाही. या संदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपाचा आढावा घेत पीक कर्ज वाटपाची स्थिती जाणून घेतली. आढावा बैठकीनंतर मंत्री सावंत (Tanaji Sawant) यांनी माध्यमांशी बोलताना बँकांना हा इशारा दिला आहे. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनानाला देखील आदेश दिले असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

धाराशिव जिल्ह्यातील बँकांना खरिपाच्या या हंगामात १ हजार ५८३ कोटी रुपये पीक कर्जापोटी (Crop Loan) वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ ७४७ कोटी म्हणजेच केवळ ४७ टक्के एवढाच पीक कर्ज या बँकांनी वाटप केल आहे. या अनुषंगाने आढावा घेत पिक कर्ज वाटपावरून तानाजी सावंत बँकांवर चांगले संतापले. ३१ जुलैपर्यंत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यास बँकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT