Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख १९ हजार शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित; ठाकरे गट आक्रमक

Dharashiv News : केंद्र सरकारच्या ३० एप्रिलच्या नवीन परीपत्रकामुळे शेतकरी खरीप २०२३ च्या विम्यापासुन वंचित राहणार आहेत.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२४ ला काढलेल्या जाचक परिपत्रकामुळे राज्यासह धाराशिव जिल्ह्यातील ३२ महसुल मंडळातील शेतकरी खरीप २०२३ च्या विम्यापासुन वंचित राहणार आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख ५६ हजार शेतकऱ्यांपैकी ३७ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित ५ लाख १९ हजार शेतकरी मदतीपासुन वंचित राहणार आहे.

केंद्र सरकारच्या ३० एप्रिलच्या नवीन परीपत्रकामुळे शेतकरी खरीप २०२३ च्या विम्यापासुन वंचित राहणार आहेत. राज्यासह (Dharashiv news) धाराशिव जिल्ह्यातील ३२ महसुल मंडळातील शेतकरी (farmer) खरीप २०२३ च्या विम्यापासुन वंचित राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला ठाकरे गटाच्या खासदार व आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांसाठी कायदेशीर व रस्त्यांवरील लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. तसेच भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर देखील (Crop Insurance) पिकविम्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर आमदार कैलास पाटील यांनी देखील पीक विम्याच्या नवीन धोरणांच्या परिपत्रकाचा निषेध करत वेळप्रसंगी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पत्रकार परिषद घेत दिला आहे. त्यामुळे पिकविम्यावरुन धाराशिवमध्ये ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

MLC Election : बंडखोरी थांबली! अब्दुल सत्तारांचा मुलगा उमेदवारी अर्ज घेणार मागे

Blue bruises on skin: कोणतीही दुखापत नसतानाही शरीरावर पडतात निळे डाग? यामागे असू शकतात हे आजार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होताच महिलांची नवीन शक्कल; 'या' योजनांसाठी सुरू झाली अर्जांची लाट

Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन, 4,500 बसेस धावणार; दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

SCROLL FOR NEXT