Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : खरीप २०२२ च्या हंगामातील २३२ कोटींचा पिकविमा मिळणार; २५ जानेवारीपर्यंत थेट खात्यात रक्कम

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२२ च्या हंगामातील उर्वरीत २३२ कोटी रुपये रक्कम देण्यास (Dharashiv) भारतीय कृषी विमा कंपनी तयार झाली. तसे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. दीड वर्षाच्या कालावधीनंतर विमा कंपनीचा (Crop INsurance) हा परतावा मिळत आहे. (Tajya Batmya)

केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढुन भारतीय कृषी विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ५० टक्के २३२ कोटी रक्कम दिली होती. याविरोधात याचिकाकर्ते शेतकरी (Farmer) अनिल जगताप यांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी कंपनी (Crop Insurance Company) विरोधात आरआरसी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर कंपनीला अखेर जाग आली. कंपनी उर्वरित २३२ कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२५ जानेवारीपर्यंत खात्यावर रक्कम 

दीड वर्षाच्या कालावधीनंतर विम्याचा परतावा मिळत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ जानेवारीपर्यंत ही रक्कम जमा होईल; अशी माहीती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT