पावसाअभावी १५ लाख हेक्टरवरील पिके संकटात 
ऍग्रो वन

पावसाअभावी १५ लाख हेक्टरवरील पिके संकटात

पाण्याचाही प्रश्न पुढच्या काही काळात गंभीर होण्याची शक्यता

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस Rain नसल्यामुळे १५ लाख हेक्टरवरील पिके संकटात आली आहेत. त्यामुळे पुन्हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना Farmerदुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकण्याची भिती वाटत आहे. पावसाअभावी सोयाबीन Soyabean, मका, कापूस Cotton ही पिकं वाळून चालली आहेत. तर पाण्याचाही प्रश्न पुढच्या काही काळात गंभीर होण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा -

कारण सध्या मोठ्या प्रकल्पांमध्येही ४८.१६ टक्केच जलसाठा आहे. मराठवाड्यात सलग तीन आठवड्यांपासून पावसाचा टिपूसही पडला नसल्यानं जवळपास ८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील खरीप पीक संकटात आले आहे. सध्या हलक्या जमिनीतील आणि माळरानावरील सोयाबीन, मका, कापूस वाळून जात आहेत. पिकाची ही स्थिती असताना लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्येही केवळ ४८.१६ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने प्रकल्पांनाही पावसाची प्रतीक्षाच आहे.

मराठवाड्यात यंदाही चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली, मात्र सध्या तरी ते दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सुरुवातीला नांदेड, परभणी,हिंगोली, जालना, लातूर या पाच जिल्ह्यांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी देखील लावली आहे. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रखडलेल्या खरीप हंगामाच्या पेरण्या शेवटच्या आठवड्यात ९८.२४ टक्क्यांवर पोहचल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Kidney : किडनी निकामी होण्याआधी सकाळी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

LPG Connection: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ३० जूननंतर कट होणार गॅस कनेक्शन; आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT