Buldhana Mahavitaran Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News: शेतकऱ्यांना दिवसाची १२ तास विज द्या; महावितरण कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसा लोडशेडींग केले जात असल्याने शेतकऱ्यांना दिवसा शेतात पिकांना पाणी देता येणे शक्य होत नाही

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : कृषी पंपासाठी महावितरणकडून आठवड्यातील तीन दिवस दिवसा वीज दिली जाते. ती देखील आठ (Buldhana) तासांचा वीज पुरवठा दिला जात असल्याने शेतकऱ्यांना पुरेशी होत नाही. रात्रीच्यावेळी शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत असते. मात्र शेतकऱ्यांना दिवसाची १२ तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी (Mahavitaran) महावितरण कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. (Tajya Batmya)

कृषिपंपासाठी देण्यात येत असलेली वीज ही दिवसा केवळ तीनच दिवस असते. उर्वरीत चार दिवस रात्रीची वीज असते. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसा लोडशेडींग केले जात असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) दिवसा शेतात पिकांना पाणी देता येणे शक्य होत नाही. यामुळे नाईलाजास्तव रात्रीबेरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यापासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे जीव धोक्यात असतो. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अधीक्षक अभियंत्यांना दिले निवेदन 

या सर्व बाबींचा विचार करून दिवसाची १२ तास विज द्या; जेणेकरून शेतकऱ्यांना रब्बी पिके गहू, हरबरा, करडी या पिकांना दिवसा पाणी देता येईल. ही मागणी घेऊन बुलढाणा मिशनच्यावतीने जिल्ह्याच्या महावितरण कार्याल्या समोर डफडे बजावो आंदोलन करण्यात आले. तश्या आशयाचे निवेदन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांना देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT