बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर 'खोड अळीचं' संकट संजय जाधव
ऍग्रो वन

बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर 'खोड अळीचं' संकट

अळीसाठी पीक विम्याचे कवच देण्याची मागणी...

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: जिल्ह्यातील घाटावरील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतले जाते. पावसाअभावी कशीबशी उगवलेली सोयाबीनवर आता नवीन संकट ओढवले आहे. सोयाबीन या पिक आता कीटक नाशकांनी ग्रासले आहे, कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

जुलै महिन्यात मोजक्या ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली. त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांन पुढे पाऊस नसल्यामुळे संकट उभे राहिलं. ज्या शेतकऱ्यांचं पीक कसंबस उगवलं तर त्या पिकावर आता खोड पोखरणारी अळी, चक्रभुंगा या अळीने आक्रमण केले आहे.

दुरून हिरवेगार दिसणार सोयाबीनचे हे शेत मात्र किड, खोड अळीने पोखरून निघतयं. बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कपाशी हे पीक घेतल्या जातं, खोड पोखरणाऱ्या अळीमुळे शेतकऱ्यांपुढे उगवलेल पीक जगवण्याचे संकट उभ ठाकलय, तसचं शेतकऱ्यांना सोयाबीनला खोड पोखरणाऱ्या अळी पासुन पीक विम्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

Puja Mistakes: पुजा करताना 'या' चुका करु नका, अन्यथा देवी-देवता होतील नाराज

प्रांत ऑफिससमोर आंदोलन; संगमनेरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमनेसामने, नेमकं प्रकरण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT