Insurance Company Saam tv
ऍग्रो वन

Beed News: विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या मुळावर; बारा हजार शेतकऱ्यांची खाती अद्याप गोठलेली

विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या मुळावर; बारा हजार शेतकऱ्यांची खाती अद्याप गोठलेली

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात बजाज विमा कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे पाहायला मिळत आहे. चूक कंपनीची (Insurance Company) असतांना नाहक त्रास मात्र शेतकऱ्यांना (farmer) दिला जातोय. शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेबारा कोटी रुपये जमा झाल्यानंतर कंपनीने जवळपास १२ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती गोठवली आहेत. (Live Marathi News)

बजाज अलियान्झ कंपनीने चुकून अतिरिक्त १२ कोटी ३५ लाख १३ हजार ३५८ रुपयांची रक्कम १२ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केल्याचा दावा केला आहे. पैसे जमा झालेल्या खासगी, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकऱ्यांची बँक खाती कंपनीच्या सुचनेनुसार गेल्या महिनाभरापासून गोठवण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प

जवळपास गेल्या १ महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांचे खाते गोठवले गेले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. दरम्यान ही कंपनीची चूक असताना त्याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना ऐन कामाच्या वेळेला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT