Beed Lightning Strike Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike: अवकाळीने घेतला शेतकऱ्याचा बळी; पाली गावात वीज पडून मृत्यू

Rajesh Sonwane

बीड : राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याची घटना (Beed) बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पाली गावात जनावरे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज (Lightning Strike) पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. आत्माराम निवृत्ती राऊत असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

मयत शेतकरी आत्माराम राऊत हे आपल्या शेतामध्ये जनावरे चारत होते. या दरम्यान पावसाचे वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळली. त्यामध्ये शेतामध्ये असलेल्या आत्माराम राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकसान भरपाई मिळावी 

दरम्यान बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. यात शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला रब्बीचा घास वाया गेला आहे. ज्वारी भुईसपाट झाली, तर कापसाच्या वाती झाल्यात. त्याचबरोबर कांदा, हरभरा याचं देखील मोठं नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT