Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : अमरावती जिल्ह्याला १२३ कोटीचा पीक विमा मंजूर; मात्र वर्षभरात रुपयाही मिळाला नाही

Amravati News : शासनाने आणलेल्या योजनेसाठी कप अँड कॅप मॉडेलचा जीआर शासनाने काढला. यामध्ये विम्याचा परतावा ११० टक्केपेक्षा जास्त होत असल्यास त्यावरील रक्कम शासन कंपनीला अदा करेल

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी सरकारने पीक विमा योजना आणली आहे. नुकसान झाल्यास शेतकऱ्याला भरपाई मिळेल. त्यानुसार (Amravati) अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. दरम्यान पावसाने नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई म्हणून १२३ कोटी मंजूर झाले असताना प्रत्यक्षात (Farmer) शेतकऱ्यांच्या हातात १ रुपया देखील मिळालेला नाही. (Latest Marathi News)

शासनाने आणलेल्या योजनेसाठी कप अँड कॅप मॉडेलचा जीआर शासनाने काढला. यामध्ये विम्याचा परतावा ११० टक्केपेक्षा जास्त होत असल्यास त्यावरील रक्कम शासन कंपनीला अदा करेल व कंपनी शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा देईल; असे असताना मात्र अजूनपर्यंत शासनाने (Crop Insurance Company) पिक विमा कंपनीला ते पैसे दिले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात (Crop Insurance) अंमलबजावणी नसल्याने शेतकऱ्यांना पिक विमा मिळू शकला नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

७९ हजार शेतकरी प्रतीक्षेत 

अमरावती जिल्ह्यात यावर्षी बाधित खरीपासाठी पीक कापणी प्रयोगाचे उत्पन्नावर आधारित ७९ हजार शेतकऱ्यांना १२३ कोटीचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र पीक विमा कंपनीने वर्षभरात शेतकऱ्यांना एक पैसाही दिला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT