Agriculture News
Agriculture News Saam Tv
ऍग्रो वन

Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यालाही अवकाळीचा फटका; अनेक ठिकाणी पिकं भुईसपाट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे

Ahmednagar Farmer News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकाला बसला असून अनेक ठिकाणी शेतातील उभी पिकं भुईसपाट झाल्याचं चित्र आहे.

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर यासह इतर तालुक्यांमध्ये झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची (Farmer) गहू, हरभरा, मका भुईसपाट झाला आहे. राहाता तालुक्यातील कोल्हार गावात अनेक शेतकऱ्यांचा हातात तोंडाशी आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. 

कलिंगड आणि द्राक्ष बागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वातावरणातील बदलामुळे कलिंगडावर रोग पडून पिकं खराब झाल्याची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे (Rain) हात तोंडाशी आलेलं पिक धोक्यात आलं आहे. सरकारकडून केवळ घोषणा सुरू असल्याचे शेतकरी बोलत आहे.

शेतीमालाला भाव नसल्याने आधिच शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच आता अवकाळी सारख्या आस्मानी संकटाने बळीराजाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सरकारने बळीराजाला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पाऊले उचलावीत एव्हढीच अपेक्षा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT