Beed : अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने 25 वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास! विनोद जिरे
ऍग्रो वन

Beed : अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने 25 वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास!

अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन अतोनात नुकसान झाल्यानं, खचून गेलेल्या 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील साळेगाव येथे आज घडलीय.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने ग्रासलेल्या पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन अतोनात नुकसान झाल्यानं, खचून गेलेल्या 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

हे देखील पहा :

ही घटना बीडच्या केज तालुक्यातील साळेगाव येथे आज घडलीय. बाळासाहेब रामलिंग गीते वय 25 वर्ष असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. हा तरुण शेतकरी या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे नैराश्यात होता. यातूनच त्याने साळेगाव शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, याची माहिती मिळताच केज पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी केज पोलिसात नोंद झाली असून मयत बाळासाहेब गित्ते यांच्या पश्चात पत्नी कोमल वय 24 मुलगा आदित्य वय 6, मुलगी अंजली वय 4 असा परिवार असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT