भात लागवड उशिरा होत असल्याने उत्पादनावर परिणामाची शक्यता

नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसामुळे भात लागवड उशिराने होत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भात लागवड उशिरा होत असल्याने उत्पादनावर परिणामाची शक्यता
भात लागवड उशिरा होत असल्याने उत्पादनावर परिणामाची शक्यतादिनू गावित
Published On

नंदुरबार : प्रत्येक वर्षी भात पिकाची लागवड जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी बांधवांकडून सुरु केली जाते. परंतु यंदा नंदुरबार जिल्ह्यात कमी पर्जन्यमान व उशिरा आलेल्या पावसामुळे भात लागवड उशिराने होत आहे. तर काही भागात पावसाअभावी भाताची लागवड खोळंबली आहे.

हे देखील पहा -

रोपण भात लागवड करण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असते. लागवडीपूर्वी शेतात चिखल करून त्यात भात लागवड केली जाते. या पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होते. भाताची लागवड केल्यानंतर त्याला कायमस्वरूपी पाण्याची गरज असते. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व बोरवेल द्वारे पाण्याची सोय उपलब्ध आहे, त्यांनी भाताची लागवड सुरू केली आहे.

भात लागवड उशिरा होत असल्याने उत्पादनावर परिणामाची शक्यता
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन!

एकंदरीत कमी पावसामुळे जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, मका, या नगदी पिकांसह इतर पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आणखी पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने यंदा भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com