सात-बारातील हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा बदल माहितीय?

सात बारा उतारा
सात बारा उतारा

अहमदनगर ः महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सात-बारा उताऱ्यात मोठा बदल केला आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सातबारा उताऱ्यात नवीन बरेच फेरबदल केले आहेत. राज्याच्या महसूल विभागाने ‘माझे शेत, माझा पीकपेरा मीच लिहिणार’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना पिकाची स्वतःच नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी तराळवाडी येथील शेताला भेट देऊन शेतकऱ्यांना त्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

राज्यभरात पिकाची सात-बारावर नोंद करताना शेतकऱ्यांना महसूल विभागावर व विशेषतः तलाठ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. यात अनेकदा चुका होत असत.New changes in seven-twelve excerpts

सात बारा उतारा
लवकरच महाराष्ट्र ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारे देशातील पहिले राज्य: मुख्यमंत्री

तलाठी कार्यालयात बसून शेतकरी सांगेल, त्या पिकाची नोंद करीत किंवा कधी कधी कोणत्याही पिकाची नोंदणी केली जात असे. इतकेच नव्हे, तर काही वेळा शेतकरीही न पेरता किंवा जे पेरले त्याऐवजी पाहिजे ते पीक नोंदवून घेत असत. या सर्वांवर उपाय व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

आता शेतकरी स्वतःच आपल्या शेतातील पीकपाहणीची नोंदणी शेतात जाऊन फोटो घेऊन सात-बारावर करू शकणार आहेत. त्यामुळे पिकाची खरी नोंद होणार आहे. याबाबतची माहिती प्रांताधिकारी भोसले यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड, नायब तहसीलदार एम. ए. माळबे, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीकनोंदणी १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत करता येणार आहे. प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती फोटोसह अपलोड केल्यावर ३० सप्टेंबरनंतर पीक पाहणी अंतिम होईल. एक ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतील, असे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले.New changes in seven-twelve excerpts

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com