सागर निकवाडे
नंदूरबार : बोगस खत व बियाणे यांची बेकायदेशीर विक्री होत आहे. त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी (nandurbar) बोगस बियाणे बाळगणाऱ्यांवर कारवाई करावी; यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (Shiv Sena) नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. (Maharashtra News)
नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बोगस बि- बियाणे (Bogus Seeds) यात मका, सोयाबिन आदी नित्कृष्ट दर्ज्याचे वाण मिळत आहे. याबाबत कृषी विभागाकडे आलेला निधी ५ ते ६ वर्षांपासून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. याबाबत नंदूरबार जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन दिले होते. परंतु एक महिना उलटूनही संबंधित विभागाकडून व त्यांच्या जिल्ह्यातील कार्यालयाकडून कोणतीही कारवाही झाली नाही.
कृषी दुकानदार यांच्याकडून बोगस खत, बियाणे औषधीचा पुरवठा (Farmer) शेतकऱ्यांना केला जात आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत आहे. तसेच कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर व ठिबक योजनेचा शासनाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेला नाही. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खत जिल्ह्यात न मिळता परजिल्ह्यात त्याची विल्हेवाट होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी खतांपासून वंचित राहत आहे. तरी देखील जिल्हा अधीक्षक कारवाई करत नाही. यामुळे बोगस खते व बियाणे विक्री करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी; अश्या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्यावतीने जिल्हा कृषी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.