तापमानाचा उच्‍चांक; केळी बागांना फटका

तापमानाचा उच्‍चांक; केळी बागांना फटका
Banana Farm
Banana FarmSaam tv
Published On

जळगाव : आठवड्यात तापमानाने नवा उच्चांक गाठला. उन्हाळ्यातील सर्वाधिक ४३ अंश तापमानाची नोंद केली असून याचा फटका केळी बागांना बसत आहे. वीजेचा लपंडाव सुरू असल्‍याने केळीला पाणी देता येणे शक्‍य नाही. यामुळे बळीराजा (Farmer) संकटात सापडला आहे. (jalgaon news High temperature Hit the banana orchards)

Banana Farm
सोशल मिडीयावरील लग्‍नाच्‍या ‘त्‍या’ व्‍हीडीओने फोडले बिंग

जळगाव (Jalgaon) शहर व जिल्‍ह्याचे तापमान ४३ अंशावर होते. दिवसभर उष्ण वारे वाहत असून उष्णतेने जळगाव, भुसावळ (Bhusawal) व रावेर तालुक्यात केळीच्या बागा सुकू लागल्या आहेत. या भागातील केळी बाहेर जात नसून शेतातच पडून आहे. त्यामध्ये हा वाढता तापमानाचा पारा शेतकऱ्याला फार मोठा फटका देणारा आहे. अजून जर तापमान वाढले तर पूर्णपणे केळीच्या (Banana) बागा सुकतील आणि शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

वीजेच्‍या लपंडावाने हैराण

वाढलेल्‍या तापमानात लोडशेडिंगचे प्रमाण देखील वाढले असून केळीला पाणी देता येत नाही. त्यामुळे ही शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. आधीच तापमान त्यात लोडशेडींग त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com